ब्रेकिंग न्यूज

दि.आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पोलीस व सैनिक कल्याण निधीस मदत.


आटपाडी प्रतिनिधी
२६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेक्यांनी मुंबईवर भ्याड हल्ला केला होता .त्यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले होते .हा हल्ला परतावून लावत असताना पोलीस व लष्करातील अनेकांनी आपले प्राण पणाला लावले होते .या अतुलनीय पराक्रमा प्रित्यर्थ प्रतिवर्षी दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मा. अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व सैनिक कल्याण निधीस मदत देण्यात येते .


          यावर्षी हा निधी आटपाडी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व माजी सैनिक मोहनराव देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री पवार सर ,निरीक्षक श्री नामदास सर, विजयादेवी देशमुख बालविकास मंदिर चे मुख्याध्यापक खरात सर व विद्यार्थी उपस्थित होते

.
Previous Post Next Post